Back to Top
  • TAKE THE FIRST STEP TO

    KNOWLEDGE WITH US

    Get Started

  • Better Education for a Better World

    Start Your Career

    Apply now

आयुश फाऊंडेशनच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी


येथील आयुश फाऊंडेशनच्यावतीने स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्त्री मुक्ती दिन ही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित शिक्षण विभागात साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या सौ. रेखा पुंड यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आयुश फाऊंडेशनचे संस्थापक सचिव श्री वामनकुमार वाणी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अधाक्षीय समारोपात आयुश फाऊंडेशनद्वारे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आदि क्षेत्रात कार्य केले जाते असे सांगितले. या कार्याचाच एक भाग म्हणून आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अक्षय शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन श्री महेंद्र हुलेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे सदस्य श्री सतीश अनवते, श्री नकुल पवार, यासह फाउंडेशनचे स्वयंसेवक रंगनाथ गायकवाड यांनी केले.

आयुश फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबीर आयोजीत

आयुश फाउंडेशन परभणी या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. ७ जुलै २०१७ रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीराचे आयोजन शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. संदीप कार्ले यांचे सर्वज्ञ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. येथील थैलेसीमिया डे केयर सेंटरच्या थैलेसीमिया पिडीत बालकांना रक्त पुरवठा करण्यासाठी हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरात आयुश फाउंडेशनच्या ऐकूण ११ रक्तदात्याने स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी डॉ. संदीप कार्ले यांनी उपस्थितांना थैलेसीमिया या आजाराची माहिती देवून मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संकलन पेढीतील डॉ. कनकदंडे, जनसंपर्क अधिकारी श्री सुहास देशमुख व त्यांच्या चमूने शास्त्रोक्त पद्धतीने रक्त संकलन केले. आयुश फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सौ. रेखा पुंड आणि संस्थापक सचिव श्री वामनकुमार वाणी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच फाउंडेशनचे सदस्य श्री सतीश अनवते, श्री नकुल पवार, श्री महेंद्र हुलेकर यासह फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री दिपक ढवळे, श्री अतुल रणखांब वा प्रा. माधव पाटील यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Tree Plantation Drive

To contribute to the Maharashtra State Government's tree plantation, Ayush Foundation organized tree plantation drive in the Lokash Nagar area of the Parbhani city. In this drive around 50 trees had been planted at specific distance. For this plantation esteemed citizens of the area were voluntarily  present and contributed their share by helping in the plantation drive of the Foundation. Three different types of trees had been planted these trees were provided by the Forest Department of the Maharashtra State Government at concessional rates. For this plantation Adv. Rasave, Mr. Bhagwan Harkal, Mr. Panchal, Mr. Hiware etc. citizens were present. Ayush Foundation volunteers Mr. Satish Anwate, Mr. Nakul Pawar, Mr. Deepak Dhawale, Mr. Atul Rankhamb worked for the success of the tree plantation drive.